8.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग दारणातून होणार
नाशिक/प्रतिनिधी
मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापलेला असताना गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांनी आग्रही भूमिका घेत गंगापूर धरणावर आंदोलन करत पाणी सोडण्याची मागणी केली होती याची दखल घेत गोदावरी महामंडळाने पाणी सोडणार असल्याचे पत्रक जारी करून 190 क्युसेक वेगाने टप्प्याटप्प्याने 8.6 टीएमसी पाणी साठा दारणा धरणातून गोदावरीत प्रवाहित करून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गी मराठवाड्याच्या दिशेने जायकवाडी धरणात पोहोचवले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे एकाएक इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने कुठली आपत्तीजनक परिस्थिती उत्पन्न होऊ नये साठी आज रात्री काही प्रमाणात पाणी सोडले जाईल तसेच दोन ते तीन दिवसात टप्प्याटप्प्याने 8.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग हा गोदावरीत केला जाईल ज्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.