वडाळा गावात इंदिरानगर पोलिसांची कारवाई 11 गुरांची सुटका
नाशिक : प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा गाव येथील मुमताज नगर येथील कत्तलखान्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार व त्यांच्या अमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत 11 गाईंची जिवंत सुटका केली या कारवाई दरम्यान प्रचंड गोपनीयता पाळण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे त्याचप्रमाणे संशयित आरोपी बबलू कुरेशी व इमरान शहा या दोन गोवंशांची कत्तल करणाऱ्या जल्लादांना बेड्या ठोकत 11 गाईंची सुखरूप सुटका करत एक लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार पोलीस हवालदार पारणकर, शेख, खान, पोलीस नाईक परदेशी, जाधव, पाठक, नागरे आदींनी यशस्वी केली.
गोवंशांची कत्तल आयुक्त कर्णिक खपवून घेणार नाही
रक्ताळलेले नाशिक मधील रस्ते, होय रक्ताळलेलेच निष्पाप गोवंशांच्या रक्ताने माखलेले आता आयुक्त संदीप कर्णिक येताच धुतले जात आहेत, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकची ओळख पुसण्याचे काम अनेक नटदृष्टांनी यापूर्वी केलं मात्र संस्कृती जपणे आणि नियम पाळणे यांना प्रथम पसंती शहर आयुक्त पदाची धुरा सांभाळत असताना व्यक्त झालेले संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये कधी येतील याची खरंतर सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. येरे माझ्या माघल्या प्रमाणे, पुन्हा तेच तेच होणार असं काही अपप्रवृत्तींना वाटत होते, तसेच गोवंश कापल्या जातोय, खरं आहे आपल्याला काय आपला खिसा भरतोय ना कशाला करायची नाशिकची चिंता अशी मानसिकता बाळगणाऱ्यांना आयुक्त कर्णिक यांनी मी तुमच्यातलाच मात्र तुमच्या विचारसरणीचा नाही, सीआरपीसी, आयपीसी, संविधान, संस्कृती, तसेच ह्युमन व्हॅल्यूजचे पालन व जपवणूक कसे करायला हवे याचा चांगलाच प्रत्यय खात्यातील सहकारी व नाशिककरांना येण्यास सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही. वाढती गुन्हेगारी तसेच अवैध धंद्या विरोधात काळजी व्यक्त करत जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांसह तातडीची बैठक घेत शहर व ग्रामीण भागासाठी हेल्पलाइन नंबर जारी केले मात्र हेल्पलाइनवर प्राप्त किती तक्रारींची दखल घेतली याबाबत काही न बोललेलं बरं. त्याचप्रमाणे शहर तसेच ग्रामीण हद्दीतील अनेक अधिकाऱ्यांना अशा अवैध कत्तलखान्यांबाबत काही सजग नागरिकांनी व्हाट्सअप वर माहिती दिलेली असताना देखील यावर कधीही ठोस पावलं उचलत कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे दाखवण्यासाठी बैठका झाल्या की काय असा संशय नक्कीच व्यक्त केला जाणार असो या सर्व गोष्टींवर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेशित करत नाशिक मध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळाली तुमच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही, शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी आपली देखील मोठी आहे व आपल्याला प्राप्त माहिती व सूचनांचं आपण प्रामाणिक पालन केल्यास गोवंशांच्या रक्ताने रक्ताळलेले नाशिक शहरातील रस्ते पुसून टाकत नाशिकला पुन्हा त्याचं जुनं वैभव मिळवून द्यायला सगळे हात एकत्र यायला हवे असे काहीसे कदाचित आयुक्तांनी सर्वांना प्रस्तावित केले असावे असा निर्वाळा नाशिककर काढत असतानाच आयुक्तांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले जात आहे.