नांदगाव प्रतिनिधी
नांदगांव मनमाड महामार्गावरील वरील नांदगांव शहरा लगत हनुमान नगर जवळील पुलावर गतीरोधक बसवल्याने या गतीरोधकामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी हे गतिरोधक काढून घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या गतिरोधक मुळे आनेक छोटे मोठे अपघात होत अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे. गतिरोधक बनविले आसता त्याच दिवसी दोन अपघात झाले त्यात गरोदर महिला व तिचे बाळ हे दुचाकीवरुन पडून जखमी झाले देखील घटना घडली आहे. दिवाळी सनाच्या काळात देखील या गतीरोधकावरुन आनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आसुन या मुळे त्यांची दिवळी दवाखाण्यात झाली. या रस्त्यावरुन दिवसभरात शेकडो वहाने जात आसतात तसेच डिझेल पेट्रोल वाहतूक करण्यार्या वाहनांची देखील मोठी वर्दळ या रस्त्यावर आसते. या गतिरोधकाची उंची जास्त आसुन ते वाहणधराकांच्या लक्षात येत नसल्याने गतीरोधकावरुन रोज दोनतीन प्रवासी दुचाकीवरुन पडून जखमी होता आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन बेकायदेशीर बनविलेले गतिरोधक काढून टाकवे अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे
या गतीरोधक मुळे या ठिकाणी रोजचे किरकोळ आपघात होत आसुन, लवकरात लवकर संबंधित विभागाने हे गतिरोधक काढुन घ्यावे,आन्यथा आम्हि हे गतिरोधक खोदुन टाकु – बापुसाहेब जाधव, नांदगाव