सप्तशृंगीगड / तुषार बर्डे
कळवण तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाचा विकास होणे संदर्भात कळवण तालुक्यातील भिल्ल समाजातील एकलव्य भिल विकास महामंच च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजातील विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विविध शासकीय योजना संदर्भात मा . विशाल नरवडे साहेब ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांना भेट घेऊन विविध सामाजिक विषयांचे निवेदन देण्यात आले निवेदनात असे मागणी केली की कळवण तालुक्यातील प्रकल्प कार्यालयातील विविध शासकीय योजना व अनुदानापासून कळवण तालुक्यात सर्वात जास्त असलेल्या भिल्ल समाज बांधव या योजनेपासून वंचित राहत असल्याने समाजावरती व भिल्ल समाज बांधवांवरती उपासमारीसह िविध योजनेपासून अधिकार्यापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने आपण आपल्या अधिकारात महाराष्ट्र शासनामार्फत आलेल्या विविध योजना या भिल्ल समाज बांधवांपर्यंत कसे पोहोचले यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे
तसेच भिल्ल समाज बांधवांसाठी विविध योजनेमध्ये 50 टक्के सहभाग घेऊन सदरच्या योजना देण्यात यावे व इतर योजना या आदिवासी बांधवातील इतर समाजांना देण्यात यावे तसेच भिल्ल समाजासाठी प्रकल्प कार्यालय अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती याबाबत आपण योग्य तो पाठपुरावा करून भिल्ल समाज बांधवांना योग्य मिळावा एकलव्य भिल्ल महाविकास मंच कळवण तालुका यांनी विविध विषयांवर मा.नरवडे साहेबांनी कार्यकर्ते समवेत चर्चा करण्यात आली सहा जिल्हाधिकाऱ्यां मा.विशाल नरवडे यांनी आदिवासी समाजातील विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व शासकीय योजना अशा अनेक प्रश्न सोडण्याचे चर्चातुन सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळेस तुषार बर्डे प्रकाश पवार पी पी पवार
भगवान बागुल भारत पवार पांडुरंग निकम सुभाष खैरनार दोधा पवार बगडू लक्ष्मण पवार भावडू माळी
किशोर गवळी बाजीराव गायकवाड सचिन वाघ
पांडु गायकवाड शिरसमणी येथील कार्यकर्ता उपस्थित होते