नाशिक प्रतिनिधी
मनमाड शहरातून जाणारा पुणे -इंदौर महामार्गांवरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे या महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे.या उड्डाणं पुलाच्या खालून रेल्वे तर वरून वाहनाची वाहतूक होते त्यामुळे वाहतुकीसाठी हा ब्रिज महत्वाचा मानला जातो सुदैवाने ब्रिज भाग रेल्वे रुळावर कोसळला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.हा ब्रिज जुनाट आणि कमकुवत झालेला असून या अगोदर एक वर्षा पूर्वी देखील अशीच घटना घडली होती मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासना तर्फे पाहिजे तेवढी दक्षता घेण्यात आली नाही त्यामुळे आजची घटना घडली आहे.